Ad will apear here
Next
‘प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार’
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील-दानवे यांनी व्यक्त केली कृतज्ञता
मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पाच वर्षे पक्षाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी असून, या कालावधीत भाजपला राज्यात पंचायत ते पार्लमेंट या सर्व स्तरावर पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविल्याबद्दल आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो,’ असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील-दानवे यांनी सांगितले.

अमित शाह यांनी सहा जानेवारी २०१५ रोजी दानवे यांची प्रथम भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन त्यांनी पक्ष संघटनेची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर १८ जानेवारी २०१६ रोजी पक्षांतर्गत निवडणुकीत दानवे यांची एकमताने व बिनविरोध प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाला. त्यानंतर त्यांनी १६ जुलैला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दानवे यांच्या कारकिर्दीत भाजप महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती अशा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २३ जागा जिंकून पुन्हा पहिला क्रमांक मिळवला.

दानवे म्हणाले, ‘प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपल्याला पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. त्यांच्या परीश्रमामुळे भाजपला पंचायत ते पार्लमेंट या सर्व पातळ्यांवर निवडणुकीत पहिला क्रमांक मिळाला. राज्यातील तिसऱ्या व चौथ्या स्थानावरून पक्षाने झेप घेतली. त्यासोबत पक्षाचा संघटनात्मकदृष्ट्या प्रचंड विस्तार झाला. समाजाच्या सर्व घटकातील लोक भाजपशी जोडले गेले.’

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अफाट लोकप्रियता, भाजपच्या केंद्र सरकारचे काम, अमित शाह यांचे संघटन कौशल्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे काम यामुळे भाजपला यश मिळाले. पक्षाला यशस्वी करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या सर्व काळात राज्यातील जनतेने भाजपला भरभरून आशिर्वाद दिला, त्यांचाही मी आभारी आहे,’ अशा शब्दांत दानवे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZNXCC
Similar Posts
‘भाजपचे डावखरे विजयी होतील’ मुंबई : ‘विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारीसाठी निरंजन डावखरे यांची केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली असून, ते निवडणुकीत निश्चित विजयी होतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २४) व्यक्त केला, तर ‘निरंजन डावखरे यांच्या विजयामुळे कोकणात भाजपला
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा यशस्वी मुंबई : राज्यात २४ जिल्ह्यांमध्ये झालेल्या विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक सरपंचपदे जिंकून भारतीय जनता पक्षाने पुन्हा पहिला नंबर मिळवला आहे. या यशाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व मतदारांचे आभार मानले.
‘जळगाव, सांगलीमधील यश हा विकासाचा विजय’ मुंबई : ‘जळगाव व सांगली–मिरज-कुपवाड महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले जबरदस्त यश म्हणजे जनतेने विकासाला दिलेला कौल आहे. या विजयाबद्दल मी मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो,’ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी शुक्रवारी (तीन ऑगस्ट) व्यक्त केली
‘मोदी सरकारचे काम गांधी विचारांनुसार’ मुंबई : महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबरला त्यांना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी अभिवादन केले आणि गांधी विचाराच्या प्रसारासाठी पदयात्रा काढल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे हजारो कार्यकर्त्यांच्या पदयात्रेचे नेतृत्व केले, तर प्रदेशाध्यक्ष

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language